#सिंधुदुर्ग जिल्हयात पाण्यावर तरंगणारा दुर्मिळ दगड सापडला आहे. घुंगुरकाठी सिंधुदुर्ग संस्थेचे अध्यक्ष सतीश लळीत आणि कवयित्री डॉ. सई लळीत यांना वेंगुर्ल्याच्या समुद्रकिनाऱ्यावर हा दगड सापडला.
गावात बालविवाह झाल्याचे सिद्ध झाल्यास सरपंच पद रद्द करावे अशी शिफारस राज्य शासनाला करण्यात आली आहे अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी दिली.
@ChakankarSpeaks
#Nashik
जी २० साठी मुंबईत आलेल्या पाहुण्यांचे स्वागत गिरगाव चौपाटीवर ढोल ताशांच्या गजरात आणि लावणी, कोळी गीतांनी करण्यात आले. यामुळे भारावून गेलेल्या या पाहुण्यांनी स्वतः नृत्यात सहभाग नोंदवला.
#G20
क्रिकेटपट
@ImRaina
नं निवृत्तीची घोषणा केली असून यापुढं कोणत्याही प्रकारच्या क्रिकेट सामन्यात खेळणार नसल्याचं एका ट्विटद्वारे जाहीर केलं आहे. क्रिकेटमध्ये देशाचं आणि उत्तर प्रदेशचं प्रतिनिधित्व करणं खूप सन्मानजनक होतं, असं रैनानं या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
#SureshRaina
#धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील वाघाडी गावचे रहिवाशी तथा भारतीय सैन्य दलाचे लान्स नायक मनोज संजय माळी यांना आज वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी सिक्कीम येथे कर्तव्य बजावत असतांना वीर मरण आले आहे.
सोलापूर ग्रामीणच्या पोलिस अधिक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील 71 गावांमध्ये हातभट्टीच्या समूळ उच्चाटनासाठी ‘ऑपरेशन परिवर्तन’ हा उपक्रम सुरु करून हातभट्टी व्यवसायामध्ये गुंतलेल्या 326 जणांचे पुर्नवसन करून चांगल्या उद्योग व्यवसायामध्ये आणण्यात आले आहे.
#मराठी ही साऱ्या देशाची संपर्क भाषा व्हावी,असं आग्रही प्रतिपादन प्रसिद्ध संशोधक #डॉ.मधुकर जोशी यांनी काल हिंगणा इथ केलं. विदर्भ साहित्य संघाच्या ६७ व्या साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षपदावरून ते बोलत होते.
बँकांनी एखादं कर्ज नामंजूर का झालं, याचं कारण मराठीत आणि ग्राहकांना समजेल अशा सोप्या भाषेत द्यावं, असं सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी म्हटलं आहे. ते आज जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिना निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
@Info_Solapur
भाजप नेते
@SMungantiwar
यांनी मुख्यमंत्र्यांना भावनिक आवाहन केले आहे. माजी मित्र म्हणून लोकांचे #वीज बिल #माफ करण्याची मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांना #विनंती केली आहे.
राज्याचे सामाजिक न्याय मंत्री
@dhananjay_munde
यांच्या संकल्पनेनुसार यावर्षीच्या #आषाढीएकादशी निमित्त #पंढरपूर कडे प्रस्थान करणाऱ्या पालखी सोहळयात ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषासह संविधानाचाही गजर केला जाणार आहे.
#परभणी #कृषिउत्पन्नबाजार समितीच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सहायता निधिस दोन लाख रुपयाचा धनादेश पालकमंत्री नवाब मलिक यांच्याकडे सुपूर्द करताना करण्यात आला.
@CMOMaharashtra
@PIBMumbai
@MahaDGIPR
मुंबई : पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या विकासाचा आढावा घेतला. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील गांधी टेकडी इथं 'रॉक क्लाइंबिंग' साठीची सुविधा आणि प्राण्यांसाठीच्या रुग्णवाहिकेचं उद्घाटन पर्यटन मंत्री
@AUThackeray
यांच्या हस्ते करण्यात आलं.
विधिमंडळात पिडीत महिलांच्या संदर्भात चर्चा करताना त्यांचं नाव थेट घेत असल्याची तक्रार राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा
@ChakankarSpeaks
यांनी संसदीय कार्य मंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे.
#दक्षिणमध्यरेल्वे ने अकोला ते खांडवा गेज परिवर्तन अंतर्गत #अकोला रेल्वे स्थानकावरील रेल्वे हाताळण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे ठरणारे यार्ड रिमॉडेलिंग चे कार्य पूर्ण. अकोला रेल्वे स्थानक हे #विदर्भ आणि #मराठवाड्याला जोडणारे अत्यंत महत्वाचे रेल्वे स्थानक आहे.
मुंबईत आयोजित
@FieoHq
च्या पश्चिम क्षेत्रिय निर्यात उत्कृष्टता पुरस्कार प्रदान सोहळयात केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री
@AnupriyaSPatel
उपस्थित.
#mumbai
#वाशिम जिल्ह्यातील पेडगावच्या विमल आणि गणेश सोनोने या दांपत्याचा मुलगा आता #ब्रिटनला शिक्षणासाठी जातोय. त्याला वेगवेग��्या तीन विद्यापीठाकडून तब्बल दीड कोटी रुपयांच्या स्कॉलरशिप मंजूर झाल्यात. वैभव विमल गणेश सोनोने असे या तरुणाचं नाव आहे.
@InfoWashim
#अमरावतीत कुटुंबाच्या हलाखीच्या परिस्थितीने छिदवाडी इथल्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्यानं
@AdvYashomatiINC
यांनी तिच्या कुटुंबियांना आर्थिक मदत केली आहे.या विद्यार्थिनीच्या भावंडांच्या शिक्षणासह तिच्या बहिणीच्या विवाहाची जबाबदारी ठाकूर यांनी स्वीकारली आहे.
@InfoAmravati
भूगर्भ शास्त्रज्ञ डॉ. एम. के. प्रभू यांना हा दगड दाखवला असता त्यांनी देखील हा दगड दुर्मिळ असून हा ज्वालामुखीजन्य सच्छिद्र खडक असल्याचं सांगितलं, अशी माहिती सतीश लळीत यांनी दिली.
#अहमदनगर जिल्ह्यातील उत्तर भागातील अकोले तालुक्याच्या पर्वतरांगामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे.
#अकोले तालुक्यातील #उडदावणे पांजरे या भागातील #धबधबे ओसंडून वाहत असल्याचे चित्र.
@InfoAhmednagar
#ahmednagar
@tisgaon123
१५ वा आदिवासी युवा आदान-प्रदान कार्यक्रम
या कार्यक्रमात झारखंड राज्यातील गुमला, खुंटी, लातेहार, सेराईकेला-खरसावन, आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम, तेलंगणा राज्यातील भद्रादरी आणि बिहार राज्यातील जमुई, लखीसराय या जिल्ह्यांतून एकूण २२० युवा सहभागी होत आहेत.
मशिदींवरचे भोंगे येत्या तीन मे पर्यंत बंद करावेत, अन्यथा देशभरातल्या मशिदींसमोर भोंग्यांवर हनुमान चालिसा लावणार, असा इशारा, महाराष्ट्रनवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. ते काल #ठाणे इथं जाहीर सभेत बोलत होते.
@RajThackeray
@Info_Thane1
@mnsadhikrut
#परभणी जिल्ह्यात एकही कोरोनाबाधित रुग्ण नसून नागरिकांना काही #अडचण असल्यास पोलीस नियंत्रण कक्ष परभणी क्रमांक 02452-226244 व व्हॉट्सऍप क्रमांक 774585 2222 व आपत्ती प्रशासन कक्षातील दूरध्वनी क्रमांक 02452-226400 येथ्लृे संपर्क करता येऊ शकतो.
@Parbhani_Police
#IndiaFightsCorona
राज्याचं राजकारण इतक्या खालच्या स्तरावर गेलं हे पाहून जीव तुटतो. महाराष्ट्राच्या पुढे अजून काय वाढून ठेवलंय हा विचार करुन मनात धस्स होतं, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख #राज_ठाकरे यांनी दिली आहे.
मुंबई मेट्रोच्या चारकोप मेट्रो डेपो येथील लाइन २ ए आणि लाइन ७ साठीच्या ट्रॅक्शन पॉवर करण्यासाठी रिसीव्हर सबस्टेशनचे काम पूर्ण .
#मुंबईमेट्रो
#मेट्रोडेपो
@MMRDAOfficial
@mybmc
@CMOMaharashtra
#सोलापूर - वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लॉकडाऊन कालावधीमधील #वीजबिल माफ झाले पाहिजे, या मागणीसाठी #नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्या नेतृत्वाखाली #महावितरणचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांच्या कार्यालयासमोर ठिय्या #आंदोलन करण्यात आले.
@Info_
सोलापूर
@MahaDGIPR
युसुफभाई हे #संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी सकाळपासुन गल्ली बोळा फिरुन पडलेला #मांजा गोळाकरुन त्याची विल्हेवाट लावतात. मागच्या वर्षी त्यांनी जवळपास ३५ किलो मांजा जमा केला होता.
#ग्रंथालय तसंच #अभ्यासिका सुरू करण्याच्या मागणीसाठी मनसेनं मुख्यमंत्री यांच्या मातोश्री निवासस्थानाजवळीन नंदादीप उद्यानात #आंदोलन केले. माँल्स् आणि दुकाने सुरू होऊ शकतात, तर अभ्यासिका का नाही, असा प्रश्न विचारणारे फलक मनसे कार्यकार्त्यांनी हाती घेतले होते.
@CMOMaharashtra
#सोलापूर एसटी आगारातील एसटी बस वैराग ते मोहोळ एसटी बसचा ब्रेक फेल झाल्याचे लक्षात आल्याने एसटी चालकांने बस थेट शेतात नेऊन वेगावर नियंत्रण मिळविले त्यामुळे जवळपास 70 ते 80 प्रवाशांचे प्राण वाचले
#परभणी जिल्ह्यातील सानपेठ पोलीस ठाण्यात पोलिस निरीक्षक गजानन भातलवंडे हे जनतेला घरात बसण्याचे आवाहन करत आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी #संचार बंदी लागू करण्यात आली आहे त्यामुळे #बंदोबस्त करताना ठिकठिकाणी जनतेला आवाहन करण्यात येत आहे.
@Parbhani_Police
@PIBMumbai
#नांदेड इथून आज सायंकाळी ०४ वाजता #पश्चिमबंगालसाठी विशेष #श्रमिकरेल्वे सोडण्यात येणार आहे. अशी माहिती नांदेड तहसील कार्यालयाने दिली आहे.
@airnews_mumbai
@Infonanded
#श्रमिक_स्पेशल_ट्रेन
इतर मागास बहुजन कल्याण प्रवर्गातल्या महिला सक्षमीकरणासाठी 'महिला स्वयं-सिध्दी व्याज परतावा योजना' सुरू केली आहे. या योजनेंतर्गत बँकांनी मंजूर केलेल्या ५ ते १० लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर १२ व्याजाच्या मर्यादेत व्याज परतावा दिला जाणार आहे, मंत्री
@VijayWadettiwar
यांची माहिती
#नांदेड जिल्हा शासकीय रुग्णालयात #कोविड-१९ या आजाराशी झुंज देत असलेल्या महिला आपल्या रक्ताच्या भावास राखी बांधू शकत नाहीत.याच शल्य त्यांच्या मनात राहू नये या भावनेतून नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे आमदार #श्री.मोहनराव हंबर्डे यांनी महिलांना शुभेच्छा दिल्या.
@InfoNanded
#जालना जिल्ह्यातील डॉ. स्वप्नील मंत्री यांनी रस्त्याची सुरक्षा आणि 'बेटी बचाओ बेटी पढाओ' या संबंधी काही सूचना केल्या होत्या. त्या सूचनांची दखल घेऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आजच्या 'मन की बात'मध्ये जनतेला या सूचनांचा अवलंब करावा असे आवाहन केले.
#PMonAIR
#MannKiBaat
#मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं (
#MMRDA
) जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड (JVLR) जंक्शन स्थानकातील अखेरच्या पाईल कॅपचे काम पूर्ण केलं आहे. हे आव्हानात्मक काम पूर्ण करून एमएमआरडीएने महत्वपूर्ण ध्येय साध्य केलं आहे.
#Mumbai
देशभरातल्या महिलांचं जीवनमान उंचावं तसंच स्त्री जन्मदर वाढावा यासाठी केंद्र सरकार #बेटीबचाओबेटीपढ़ाओ हे अभियान राबवत आहे. या अभियानाअंतर्गत #वाशीम जिल्ह्याने आजवर केलेल्या कामाविषयीची माहिती वाशीम जिल्ह्याच्या बालविकास अधिकारी प्रियंका गवळी यांनी दिली.
@InfoWashim
#कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीनं ६२ अनुकंपा तत्वावरील कर्मचाऱ्यांना कायम करण्याचे आदेश ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते आज सुपुर्द करण्यात आले.
@mrhasanmushrif
@Info_Kolhapur
#भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील पाणी आज सकाळ पासून कमी प्रमाणात का होईना ओसरायला सुरु झाले असले तरीही अनेक गावात पाणी अजूनही आहे. अनेक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहचविण्याचे काम NDRF आणि SDRF करीत असले तरीही या पुरामुळे आतापर्यंत अनेक घरं तसेच लाखो हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे.
मुंबईत भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने क्रांती दिनाचे औचित्य साधून आज भारतीय जनता युवा मोर्चातर्फे ‘तिरंगा यात्रा बाईक रॅली’चे आयोजन करण्यात आले .
#AmritMahotsav
#KrantiDiwas
वाशिम जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन आणि जिल्हाबंदी नियमांचे पालन करण्याबाबत जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी आवाहन केले आहे.
#कोविड19
#करोना
#वाशिम
राज्यात गेल्या ३ महिन्यांत बेपत्ता होणाऱ्या मुली आणि महिलांच्या वाढलेल्या संख्येविषयी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर सोमवारी बैठक घेणार आहेत. यासाठी राज्याच्या गृहसचिवांना प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचे आदेश रुपाली चाकणकर यांनी दिले आहेत.
@ChakankarSpeaks
@MahaDGIPR
ग्रुप कॅप्टन शालिझा धामी या भारतीय वायूसेनेच्या लढाऊ युनिटचं नेतृत्व करणाऱ्या पहिला महिला अधिकारी बनल्या आहेत. ग्रुप कॅप्टन शालिझा धामी या पश्चिम क्षेत्राच्या क्षेपणास्त्र स्क्वॉड्रनचे नेतृत्व करणार असल्याचं भारतीय वायूसेनेनं काल जाहीर केलं.
@IAF_MCC
बहुजन कल्याण मंत्री
@VijayWadettiwar
यांच्या पुढाकाराने #ओबीसी, #व्हीजेएनटी, #एसबीसी प्रवर्गातील दहावीनंतर पुढील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी २९२ कोटी ८१ लाख ८५ हजार रुपये शासनाने मंजूर केले आहेत.त्याबाबतचा #शासन_निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशनच्या माध्यमातून #पर्यावरण पूरक बाप्पा साकारण्यात आले आहेत. महा मुंबई मेट्रो डेपोच्या रोपवाटिकेत कर्मचाऱ्यांनी पर्यावरण पूरक आठ प्रकारच्या रोपांच्या माध्यमातून गणपती बाप्पा साकारले आहेत.
@mybmc
@MMMOCL_Official
@PIBMumbai
एक झाड माझे अभियान, या #नांदेड शहरातील पर्यावरण संरक्षण ग्रुपच्या वतीने आज शहरात पाचशे वृक्षांची लागवड करण्यात आली. नांदेड शहरातील पाच किलोमीटर लांबीच्या कॅनॉल रोडवर गतवर्षी या ग्रुपच्या वतीनं पाच हजार वृक्ष लागवड करण्यात आली होती.
@InfoNanded
#मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आयुक्त आर. ए. राजीव यांनी #चारकोप #मेट्रो डेपोला भेट दिली.यावेळी अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत मेट्रो लाईन २ ए,चारकोप मेट्रो डेपोमधील मेट्रो प्रकल्पांच्या कामांबाबत चर्चा करण्यात आली.प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला.
@MMRDAOfficial
लॉकडाऊनच्या काळात डिजिटल शिक्षणाचे महत्व अधोरेखित झाले आहे. हीच बाब लक्षात घेऊन एम. जे. एज्युकेशन ट्रस्टने #बोरिवली इथं #डिजिटलक्लासरूम ची निर्मिती केली आहे. या #सीबीएससी बोर्डाच्या डिजिटल क्लासरूमचे उद्घघाटन आज विधानपरिषद आमदार प्रसाद लाड यांच्या हस्ते करण्यात आलं.
@PrasadLadInd
#हिंगोली लोकसभा मतदार संघातील शेतकऱ्यांना देण्यात येणारे पीककर्ज आणि बँकांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित करत खासदार #हेमंत पाटील यांनी अर्थमंत्री #निर्मला सीतारामन यांची भेट घेऊन बँकांची कार्यप्रणाली व मनुष्यबळ आणि पिककर्जाचा टक्का तात्काळ वाढविण्यात यावा,अशी मागणी केली.
#कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरगुती महिला कामगाराना पाच हजार रुपयांची शासकीय मदत देण्याची मागणी बहुजन वंचित महिला आघाडीच्या डॉ.विजया चव्हाण यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
@PIBFactCheck
राज्यातली #कोविड स्थिती नियंत्रणात असून नागरिकांनी घाबरण्याचं कारण नाही, असं राज्याचे #आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. पंतप्रधानांनी कोविड संदर्भात घेतलेल्या आढावा बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते.
@MahaDGIPR
@rajeshtope11
@CMOMaharashtra
#coronavirus
#COVID19
महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री #पृथ्वीराजचव्हाण यांनी #मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी केंद्र सरकारकडे अहवाल सादर केला होता. या अहवालावर प्रधानमंत्री
@narendramodi
यांनी दहा वर्षे उलटूनही काही निर्णय घेतला नाही, असा आरोप #जयरामरमेश यांनी समाजमाध्यमांवर केला.
#Marathi
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी केंद्रीय स्तरावर तातडीने पाठपुरावा करावा यासाठी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र दिलं आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून शासन सन २०१२ पासून प्रयत्न करत आहे.
@neelamgorhe
देशात गेल्या १० वर्षात मजुरीचे दर वाढले नाहीत, असा आरोप काँग्रेस पक्षानं केला आहे. तसंच मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात मजुरांच्या ‘वास्तविक वेतन दरात’ घट झाल्याचं जयराम रमेश यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते.
#Congress
#JairamRamesh
राज्यात कालपासून १२ ते १४ वयोगटातल्या मुलांना #कोर्बेव्हॅक्स ही लस देण्यास सुरुवात झाली. यासाठी राज्याला लसीच्या ३९ लाख मात्रा मिळाल्या आहेत.
@MahaDGIPR
@CMOMaharashtra
@rajeshtope11
#अकोले तालुक्यातील कोतुळ नदीतुन मोठा विसर्ग सुरू असल्यानं नगरला #पाणीपुरवठा करणारे मुळा #धरण पूर्ण क्षमतेने भरले .त्यानंतर धरणाचे अकरा दरवाजे उघडून दोन हजार क्यूसेक वेगाने सोडण्यात आले.#अहमदनगर शहराची तहान भागविणारे धरण म्हणून या धरणाची ओळख आहे.
@InfoAhmednagar
#लातूर जिल्ह्यातील काही गावात #सोयाबीन पिकाला चक्री भुंगा, खोड अळी आणि करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून त्यांना #पीकविमा नुकसानीच्या नियमानुसार २५% रक्कम आगाऊ द्यावी, अशी #मागणी आमदार अभिमन्यू पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
जागतिक महिला दिनानिमित्त रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडीतर्फे कोविड योद्धा महिलांचा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते सत्कार.
@RamdasAthawale
#नांदेड जिल्ह्याच्या #हदगाव तालुक्यात सततच्या पावसामुळे #कापूस, #तुर अशी पिके आडवी पडली आहे.सुपीक शेत खरडली असून शेतीचे खूप नुकसान झाले आहे.त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत पडला आहे.
@InfoNanded
@MahaDGIPR
@PIBMumbai
#मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाद्वारे वांद्रे-कुर्ला संकुलात वाहतुकीची समस्या कमी करण्यासाठी सार्वजनिक सायकल सेवा सुरू करण्यात आली आहे. आज मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त आर. ए राजीव यांच्या हस्ते सार्वजनिक सायकल सेवेला सुरुवात करण्यात आली.
देशातील चौथा आणि महाराष्ट्रातील पहिला #रेल्वे बोगी प्रकल्प #लातूरात उभारला जात आहे. या प्रकल्पातून मेट्रो कोच तयार करण्यात येणार असल्याचे यापुर्वीच सांगण्यात आले आहे. त्यानुसार रेल्वे कोेच प्रकल्पात आज पहिला कोच शेल तयार झाल्याची माहिती आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली आहे.
ग्राहकांना वीज देयकात सूट देण्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष
@RajThackeray
यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले. टाळेबंदीमुळे व्यावसायिक आस्थापने ३महिने बंद असूनही त्यांना अव्वाच्या सव्वा वीज आकारली गेली आहेत.असे त्यांनी पत्रात म्हटलं आहे.
@CMOMaharashtra
राज्यात गेल्या महिन्याच्या तुलनेत कोरोना विषाणू संसर्ग रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून चौथ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी स्व��: हून मास्क वापरणं, लस घेणं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
@CMOMaharashtra
@rajeshtope11
@MahaDGIPR
#पालघर जिल्ह्यातील #मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी लोकल सेवा सुरू करा ही सर्वमान्य मागणी करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उप-जिल्हाध्यक्ष समीर मोरे यांच्या नेतृत्वाखाली सविनय कायदेभंग करत पालघर ते #केळवा रोड स्टेशन पर्यंत रेल्वे प्रवास केला.
@InfoPalghar
@MahaDGIPR
#कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी आज विजांच्या कडकडाटात पाऊस पडेल. या भागांत सोसाट्याचा वारा देखील वाहण्याची अंदाज #हवामान खात्याने वर्तविला आहे. राज्यात काल सर्वाधिक कमाल #तापमानाची नोंद ब्रह्मपुरी इथं ४५ पूर्णांक २ अंश सेल्सिअस झाली.
#WeatherUpdate
@Hosalikar_KS
#नांदेड जिल्ह्यात सतत होत असलेल्या पावसामुळे शेतीच अतोनात #नुकसान झाले आहेत.अनेक भागात #सोयाबीन आणि कापसाला मोड फुटले आहेत.
@InfoNanded
@MahaDGIPR
@PIBMumbai
#महात्मागांधी यांच्या १५१ व्या जयंती निमित्त नांदेड च्या #संगत प्रकाशनाने #प्रकाशित केलेल्या प्रा. जगदीश कदम लिखीत "गांधी समजून घेतांना" या #पुस्तकाचं #विमोचन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते आज मुंबईतून आॅनलाईन कार्यक्रमात करण्यात आलं.
@InfoNanded
@supriya_sule
@mybmc
#सांगली जिल्ह्यात जत तालुक्यामधल्या सनमडी इथल्या म्हैसाळ कालव्याचं पाणीपूजन आज #पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते झालं. या कालव्यामुळे सनमडी ते मंगळवेढा तालुक्याच्या सीमेपर्यंतची सुमारे ७ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.
@Info_Sangli
@Jayant_R_Patil
काँग्रेस नेते
@sanjaynirupam
यांनी काल मुख्यमंत्री
@mieknathshinde
यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. निरुपम यांनी २० वर्षांपूर्वी शिवसेना सोडून काँग्रेस मध्ये प्रवेश केला होता. आता ही घर वापसी करत असल्याबद्दल समाधान वाटत असल्याचं त्यांनी सांगितलं.
#LokSabhaElections2024
📷
राज्यातील एकही सर्वसामान्य गोरगरीब रुग्ण पैशाअभावी उपचाराविना राहणार नाही याची काळजी घ्या, असा आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. त्यांच्या सुचनेनुसार रुग्णांना दिलासा देण्याचा आम्ही प्रयत्न करतो,असं मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी सांगितलं आहे.
राज्याचं नवं प्रस्तावित सांस्कृतिक धोरण सर्वंकष असेल, आणि इतर राज्यं महाराष्ट्राच्या सांस्कृतिक धोरणाचं अनुकरण करतील, असा विश्वास सांस्कृतिक कार्य मंत्री
@SMungantiwar
यांनी व्यक्त केला आहे.
#रमाई_आवास_घरकुल_योजनेअंतर्गत राज्यात ग्रामीण भागात 1 लाख 13 हजार 571 तर शहरी भागात 22 हजार 676 घरकुलांच्या उद्दिष्टास सन 2021-22 या आर्थिक वर्षासाठी राज्य शासनानं मान्यता दिली आहे. सामाजिक न्याय आणि विशेष साहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी ही माहिती दिली आहे.
@dhananjay_munde
शालेय शुल्कासाठी #तगादा लावण्याच्या अनेक तक्रारी आमदार डॉ.मनीषा कायंदे यांच्याकडे आल्या आहेत. आज शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेऊन त्यांच्याकडे #खाजगी #विनाअनुदानित शाळांवर #कारवाई करण्याची मागणी डॉ.मनीषा कायंदे यांनी केली आहे.
@VarshaEGaikwad
@MahaDGIPR
@mybmc
#सोलापूर चे ग्रामदैवत श्री सिध्देश्वर महाराज यांचे मंदिर उघडावे यासाठी वंचित आघाडीच्या वतीने आज आंदोलन करण्यात आले. इथे फोटो पूजनानंतर कार्यकर्त्यांनी सिद्धरामेश्वराचा जयघोष केला. नगरसेवक आनंद चंदनशिवे, पुजारी यांच्यासह सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
राज्याचे #आपत्ती व्यवस्थापन, #भूकंप, मदत व #पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज नक्षल्यांच्या हल्ल्यात #शहीद झालेला पोलिस जवान दु्ष्यंत नंदेश्वर याच्या कुटुंबीयांची #भेट घेऊन #सांत्वन केले.
@VijayWadettiwar
@InfoGadchiroli
#साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षे जयंती निमित्त #नांदेड इथ अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास मराठा सेवा संघ, संत तुकाराम महाराज साहित्य परिषद, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड यांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
@InfoNanded
#आण्णाभाऊ_साठे_जयंती
आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्तविभागातर्फे हंगामी स्वरुपाच्या विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. वृत्तनिवेदक-तथा भाषांतरकार, वृत्तसंपादक -तथा- वार्ताहर, वार्ताहर, प्रसारण सहाय्यक,आणि वेब सहाय्यक या पदांसाठी पात्र उमेदवारांना अर्ज करता येतील.
गरीब, गरजू, बेघर आणि भूमीहीन लाभार्थ्यांना पावसाळ्यापूर्वी घरकुलाचा लाभ देण्याकरता ५ लाख घरकुलांचं बांधकाम युद्धपातळीवर पूर्ण करण्यासाठी महा आवास अभियानाला ५ जून, २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्याची घोषणा ग्रामविकास मंत्री
@mrhasanmushrif
यांनी केली आहे.