Founder & Chairman-Kelvinsgroup, LiquigasIndia,FahrenheitHC,BluFlamTech.Blessed to call my passion my profession,LoveWriting,Innovations-Thermal Energy,BleedLPG
आजही एसटीकडे
१. प्रवासी आहेत.
२. ड्रायव्हर,कंडक्टर,सपोर्ट स्टाफ आहे.
३. गुडविल,नेटवर्क,इन्फ्रास्ट्रक्चर भरपूर आहे.
४. सर्वात महत्वाचं दर किफायतशीर आहेत.
५. विश्वासार्हता तर सर्वाधिक आहे.
खरा प्रॅाब्लेम हा अयोग्य मॅनेजमेंट आणि त्याचे दूरदृष्टीहीन नेतृत्व करणाऱ्यांमधे आहे.
स्वप्न पहायला हवीत…..ती खरी होतात!
लहानपणापासून आजपर्यंत नवी पुस्तकं खरेदी केली त्याच्या पानावरुन हात फिरवायला, तो फिल घ्यायला, नव्या पानंचा सुवास घ्यायला खुप आवडायचं…
स्वतःच्या पुस्तकाची अशी जन्मापासूनची प्रक्रिया पाहणं अवर्णनीय आहे.
आनंदाचं पान❣️
आजचा मुंबई-पुणे प्रवास
- एकाही टोलनाक्यावर
#FasTag
असूनही सलग जाता आले नाही.
- जाताना २ टोलनाके मिळून १० मिनीटं वेळ वाया गेला.
- येताना तळेगावला तब्बल १५ मिनिटं आणि ३ लेन बदलल्या तेंव्हा स्कॅन झाले.
बॅलंस असूनही मनस्ताप, गुंडगिरीची भाषा…सगळं गंडलय पण कोणाला काय पडलं नाय!
🤦♂️😔
श्रीमंत व्हायचं असेल तर “आर्थिक शिस्त” हवी, आणि ती ही “अगदी कडक!”
त्यासाठी -
१. भावनांवर नियंत्रण
२. इतरांशी तुलना बंद
३. वर्षाच्या सुरूवातीलाच आर्थिक नियोजन
या अगदी बेसिक गोष्टी सूरू केल्या तरी दोन-तीन वर्षातच आर्थिक स्थिती बऱ्यापैकी सुधारते.
#आर्थिकसाक्षरता
मुंबई-पुण्यापलीकडचा महाराष्ट्र मला फार अस्वस्थ करतो.
आरोग्यसुविधांची वानवा,
रोजगाराचे प्रश्न, शेती,वीज,पाण्याची संकटं,
शिक्षणाचा दर्जा, उच्चशिक्षणाच्या संधी, स्किल डेव्हलपमेंट,
लोकांमधे विज्ञान-तंत्रज्ञानाऐवजी इतिहास, राजकारण,व्हॉट्सॲपमुळे वाढत असलेली नको इतकी टोकाची भूमिका 🤦♂️
पवार साहेबांना काम करताना, प्रवास करताना, बोलताना पाहिलं की वेगळीच उर्जा मिळते….. अफाट कर्तृत्व आणि अभ्यास असलेली ही अशी माणसं म्हणजे महाराष्ट्राचं खरं वैभव आ��ि अभिमान! 🙌🙏
मुंबईत आल्यानंतर सर्वात आपुलकीची जी काही थोडीफार माणसं वाटायची त्यात बेस्ट बसचे कंडक्टर आणि नाक्यानाक्यावरचे पोलिस…..बिनधास्त जाऊन काय हवी ती माहिती विचारायची!
या मायानगरीत त्यांच्यात “आपलेपण” वाटायचं; अगदी अस्सल “आपलेपण”
आजही ते तसच आहे , ते टिकायला हवं!
आपल्याकडे बहुतांशवेळा आदर हा आर्थिक श्रीमंतीशी निगडीत असतो, आर्थिक विवंचनेत असणाऱ्या प्रचंड विद्वान माणसालाही लोकं वेडा म्हणायला कचरत नाहीत.
एकवेळ गडगंज पैसा नसला तरी चालेल पण इतरांकडे हात पसरायची वेळ येऊ नये याची काळजी घ्यायलाच हवी.
बचतीची सवय असलेला माणूस म्हणजे हसण्याचा विषय आणि ऐपतीपेक्षा वारेमाप खर्च करणारा म्हणजे खरा दिलदार….. हाच सापळा आहे,
पैशांचे महत्व आयुष्यात फार मोठे आहे. ते समजले की चांगल्या सवयी आपोआप लागतात.
शाळेच्या वर्गात पहिला येणारा प्रत्येक विद्यार्थी भरपूर पैसे कमवून श्रीमंत होतोच असे नाही कारण पैसे कमवायला फक्त शैक्षणिक बुद्धीमत्ता,देशीविदेशी पदव्यांची प्रमाणपत्र नाही तर
▪️कंफर्ट झोन सोडण्याची तयारी
▪️धोके पत्करण्याची सवय
▪️व्यावहारिकपणा
▪️माणूसकी
▪️प्रसंगानुरूप लवचिकता लागते.
मराठी माणसाला घर नाकारलं जातयं यात नवं ते काय? हे डायरेक्टली-इंडीयक्टली चालत आलेलं वर्षानुवर्षाचं कटूसत्य आहे.
भावनिक पोष्टी करून काही होणार नाही, कृती महत्वाची…..
बुद्धीवंत, हुशार तरूण मराठी युवक मुंबईत यावा, तो इथे टिकावा म्हणून आहेत का काही योजना?
करणार का त्यांच्या…
कोणी काहीही म्हणो जगात पैशाशिवाय काही होत नाही. तो मिळविण्याचे चांगले-वाईट दोन्ही मार्ग आहेत.
वाईटाचे हजारो मार्ग पण चांगल्याचा एकच ‘ज्ञान अन प्रामाणिकपणा’ त्यासाठी ‘वाचनासारखा’ दुसरा सोपा मार्ग नाही.
आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्यात सखोल ज्ञान मिळवा…पैसा चुंबकासारखा चिकटेल.
ज्यांच्या घरी वेगवेगळ्या विषयांवरच्या पुस्तकांच वाचन होतं ती लोकं, कुटूंब भारी असतात…..त्यांच्या लहान मुलाबाळांतही त्या ज्ञानाचं तेज दिसतं!
प्रत्येकाच्या घरात एक तरी पुस्तकाचं कपाट यावं. अज्ञान, भेदभाव, गरीबी, द्वेष या सर्वांना कायमच गाडून टाकायला तेवढंच पुरेसं आहे.
🙏📚
हे काका एवढ्या भयंकर गरमीत, भर दुपारी, उन्हातान्हात फिरून कुल्फी विकताहेत ते त्यांच्या कुटुंबाला चार घास खायला मिळावेत, पोराबाळांच शिक्षण व्हावं, अन त्यांच्या नशीबात हे कष्ट न यावं म्हणून.
या कष्टाची त्यांच्या मुलाबाळांना जाणीव रहायला हवी हीच प्रार्थना!
कृतज्ञता, आभार, धन्यवाद, आदर, आनंद आणि इतर अनेक फॉरमॅलिटीजच्या पलिकडे अजून बरचं काही लिहायचं, प्रत्यक्ष बोलायचं बाकी आहे…..
हे पुस्तक सत्यात उतरलं ते केवळ अन केवळ तुमच्या प्रेम अन मायेमुळेच❣️✊
आपल्याला मिळून खूप पुढे जायचयं, साथ असूद्या 🙏
#गोष्टपैशापाण्याची #आर्थिकसाक्षरता
जो महाराष्ट्रात राहतो, इथेच कमावतो, इथलं खातो, जगतो तरीही महाराष्ट्राच्या, मराठीपणाच्या मुळावर उठतो तो कितीही पिढ्यांपासून इथे राहिला तरीही तो परप्रांतीयच!
कोणतेही लोन पुर्ण भरून झाले तरी त्या हप्यांएवढी रक्कम (EMI) पुढचे काही महिने तशीच एका वेगळ्या बॅंक अकाऊंटमधे टाकत त्याची “बचत” करायची.
जमा झालेली रक्कम मुलांच्या भविष्यासाठी किंवा इतर योग्य कामी “गुंतवणुक” करावी.
एक वेगळी आठवण तर राहतेच आणि चांगली सवयही लागते.
#आर्थिकसाक्षरता
मुंबईत आल्याआल्या काय शिकलो तर, ओळखपाळख न पाहत��� जो संकटात दिसेल त्याला मदत करायची.बर ती तिथल्या तिथं विसरायची.
पुढे लगेच स्वत:ला सांभाळत येणारी लोकल पकडून जीवाच्या आकांताने इच्छित स्टेशनवर उतरायचा प्रयत्न करायचा.
कधी आपण अडकलो तर असाच कोणीतरी येतो, मदत करतो-पुढे जातो.
#मुंबई❣️
प्रवाहासोबत जाणारे पालापाचोळ्यासारखे वाहत जातात…..
विरूद्ध दिशेने जायला प्रचंड इच्छाशक्ती लागते…..जगण्याची एक वेगळीच धडपड, कोण साथसोबत करेल की नाही खात्री नसते.
हवा तसा शेवट होईल की नाही याचीही हमी नसते…..फक्त लढायचं…..जीवाच्या आकांताने पण कधी “पालापाचोळा” नाही व्हायचं.…!
ज्या कामाचे आपल्याला पैसे मिळतात त्याला नेहमी आनंदाने “टॉप प्रायोरिटी” द्यायला हवी.
त्या कामात सर्वोत्तम दर्जा दिला की - काम असो की पैसे कधीही कमी पडत नाही.
#BusinessDots
वयाच्या २३व्या वर्षी मी पहिला व्यवसाय सूरू केला होता. अत्यंत वाईट पद्धतीने त्यात अपयश आल्याने पहिले प्रेमाने विकत घेतलेले घर माझ्या नावावर व्हायच्या आतच विकावे लागले होते.
कर्जबाजारीपणा अन कफल्लक होणे काय? हे नको त्या वयात फार क्रूरपणे
#SaturdayThread
#BusinessDots
#मराठी
१/१२
१. बजेट आवडले तर ठिक आहे.
(खरचं कळले तर)
२. बजेट नाही आवडले तर पुढच्या निवडणुकीला न विसरता मतदान करा.
३. आता वरील दोन्ही गोष्टी बाजूला ठेवा आणि स्वत:च्या बजेटचे पहा.
अगदी मनापासून सांगतोय या वर्षाचे स्वत:चे नीट बजेट तयार करा, अतिरिक्त खर्च टाळा, काही बचत होतेय का पहा!
#नियोजन
बचत वाढवायचा साधा उपाय - एक संपुर्ण वेगळं खात बॅंकेत उघडा, दर महिन्याला ठराविक रक्कम त्यात जमा करा.
अधूनमधून ज्या ज्या वेळी कोणत्याही वाटाघाटीतून रक्कम वाचत जाईल ती ही त्यात ट्रान्सफर करा!
कमीतकमी सहा महिने तरी त्यातून पैसे काढू नका, एकदा सवय लागली की त्याचे महत्व आपोआपच कळेल.
आपल्याकडे श्रीमंत म्हणजे भरपूर पैसे उडविणारा, अमाप खर्च करणारा, भारी गाड्या फिरवणारा अशीच इमेज बनलेली असते…… आणि तीच चुकीची आहे.
श्रीमंत म्हणजे आलेला पैसा जपायचा कसा आणि नक्की गुंतवायचा कुठे हे बरोबर कळते…..
पैशांचे ओंगळवाणे प्रदर्शन म्हणजे बौद्धिक दरिद्री; श्रीमंती नव्हे.
पंजाबी थाळी, दक्षिण भारतीय थाळी, गुजराती थाळी तशी महाराष्ट्रीयन शाकाहारी थाळीची साखळी हॉटेल्स तयार व्हायला हवीत….. चहा, मिसळ, वडापाव, अल्पोपहार याच्या पुढेही मराठी खाद्यसंस्कृती जायला हवी!
ट्विटरचा खरा वापर सूरू झाला लॉकडाऊनमधे. बऱ्याच ज्ञात-अज्ञात मंडळींच्या मार्गदर्शन आणि सहकार्याने तो निळ्या टिकच्या जबाबदारीपर्यंत आलाय.
इथे सुरूवातीला ओळखपाळख नसतानाही अमर्याद प्रेम, माया, विश्वास, आपुलकी, मिळाली. या उपकाराची जाणीव व कृतज्ञता कायम असेल.
सर्वांचे खूप धन्यवाद 🙏
गाड्यांसाठी, सुट्टीत फिरायला जाण्यासाठी, लग्नकार्यासाठी, तसेच कर्मकांडांसाठी जेवढे कमीत कमी कर्ज घेता येईल ते चांगले….
कारण अशा पद्धतीची कर्ज तूम्ही श्रीमंत होण्याच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा असतात.
#आर्थिकसाक्षरता
तीन महत्वाचे फायनान्शियल गोल्स -
१. वर्षभरात बचत किती करणार?
२. गुंतवणुक कुठे अन कशी करणार?
३. उत्पन्न आणि बचत याचे प्रमाण कसे वाढवणार?
याशिवाय शिक्षण, मेडीक्लेम, इमरजंन्सी फंड, सणसुद, इतर खरेदी, टूर्स आणि हॉटेल्स या खर्चाचेही याचेही योग्य प्रमाणात नियोजन हवे.
#आर्थिकसाक्षरता
कॉर्पोरेट करियरमधे कधीही कोणा “एकाचा माणूस” होऊ नये, आपण फक्त “कामाचा माणूस” व्हायचा प्रयत्न करायचा.
याचा सुरुवातीला त्रास होतो पण लॉंगटर्ममधे करियर १००% फुलते, बहरते.
गरीबांचे प्रश्नच मुळी वेगळे असतात…गरीबी फक्त वापरून घेतली जाते, नाडली जाते. ती दूर करण्यात कोणालाही काडीचाही इंटरेस्ट नसतो!
यातून एकावेळी सर्व बाहेर पडूच शकणार नाहीत…विमानातल्या सुचनेसारखं- प्रथम स्वतः ऑक्सिजन मास्क लावा मग इतरांना मदत करा!
कोणी काहीही म्हणो- पहिले पैसा कमवा!
मला बऱ्याचदा वाटतं महाराष्ट्राच्या ग्रामिण भागातून आपले तरूण एकदा तरी मुंबईत यायला हवेत. स्किल्ड, सेमिस्किल्ड आणि अगदी कोणताही अनुभव नसला तरी चालेल.
इथे सुरूवातीला थोडा स्ट्रगल होईल पण जे टिकतील त्यांच नक्की भलं होईल.
सरकारने यासाठी काहीतरी योजनाबद्ध कार्यक्रम हाती घ्यायला हवा.
ट्विटरकडे जगभरात मिळून फक्त सहा हजाराच्या आसपास कर्मचारी आहेत तर फेसबुककडे एकसष्ट हजार.
आणि एकट्या टाटा सन्स कडे आठ लाख कर्मचारी काम करतात…!!
भारतासारख्या अवाढव्य लोकसंख्या असलेल्या देशात रोजगारनिर्मीती ही पहिली गरज आहे.
मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री वाढायला हवी.
कोणतेही लोन पुर्ण भरून झाले तरी त्या हप्यांएवढी रक्कम (EMI) पुढचे काही महिने तशीच एका वेगळ्या बॅंक अकाऊंटमधे टाकत त्याची “बचत” करायची.
जमा झालेली रक्कम मुलांच्या भविष्यासाठी किंवा इतर योग्य कामी “गुंतवणुक” करावी.
एक वेगळी आठवण तर राहतेच आणि चांगली सवयही लागते.
#आर्थिकसाक्षरता
मुंबई-पुणे रस्त्यावर कोणत्याही फुडमॅालला तीन प्रकारची लोकं दिसतात,
१. पोटाची भूक भागविण्यासाठी कमीतकमी किंमतीतले पदार्थ शोधत असतात.
२. जिभेचे चोचले पुरवण्यासाठी धावाधाव करणारी मंडळी.
३. घरून पिशवीत बांधून आणलेला डबा मनापासून खाणारे लोकं.
३ नंबरचे लोक मला जास्त भावतात.
बचत वाढविण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे स्वत:च्या गरजांचे कायम ऑडीट करत रहायचे.
जे गरजेचे ते चालू ठेवायचे, इतर शॉऑफच्या फॅन्सी, लक्झरी गोष्टी बंद करायच्या...
#आर्थिकसाक्षरता
खूप दिवसांनी मराठी भाषेत मेंदूबद्दल पर्यायाने मानवी बुद्धीसंबंधी इतका चांगला आणि सुटसुटीत व्हिडीओ पाहिला.
अगदी वेळ काढून सहकुटूंब नक्की पहावा असा तो आहे, धन्यवाद
@bbcnewsmarathi
@SidhGanu
🙏
हाताला लागेल ते किंवा कोणीतरी वाचतो म्हणून वाचण्यापेक्षा-
🔹एखाद्या विषयावर ज्ञान मिळवण्यासाठी
🔹मन शांत होण्यासाठी
🔹स्वतःच्या चूका समजून योग्य मार्ग शोधण्यासाठी
🔹आयुष्यात प्रगती करण्यासाठी
🔹माणसं वाचायला शिकण्यासाठी
आधी योग्य पुस्तकं वाचायला हवीत,आयुष्य खूप सोपे होऊन जाते!
रोज स्वत:ला चॅलेंज करा - आपल्या कार्यक्षेत्राशी संबंधीत कमीतकमी १० नवीन शब्दांचा शोध घ्यायचा. त्यांचा नीट अर्थ समजून घ्या.
आपल्या विषयात ‘नैपुण्य’ मिळविण्याच्या दृष्टीने टाकलेले ते पहिले पाऊल असते.
हेच ‘ज्ञान’ आपले ‘भविष्य’ घडवते.
या वर्षात प्रगती करायची असेल तर प्रथम या गोष्टी करा!
१. मोबाईलचा अतिरेक टाळा!
२. टिव्ही, डिजीटल समाजमाध्यम,बातम्या, राजकारण, क्रिकेट कमी करा!
३. अवांतर वाचनाऐवजी आपल्या कामाशी निगडीत माहीतीपुर्ण वाचन वाढवा.
४.आरोग्य आणि मानसिक स्वास्थ जपा.
५.मित्र निवडताना काळजी घ्या.
#MPSC
परिक्षेतून (फक्त) सिलेक्ट झालेल्या मुलांची अवस्था हल्��ी पहावत नाही…..
समाजमाध्यमातील त्यांचा वावर आणि भावना अस्वस्थ करतात.
सरकारमधील एकाही संवेदनशील आमदार,खासदाराला हे कळू नये हे दुर्दैव आहे. तेही सोडा त्यांच्यासारखेच गरीबीतून वर आलेले अधिकारीही मूग गिळून गप्प बसताहेत.🤦♂️
माफ करता यायला हवं आणि विषय सहज सोडून द्यायला (डिटॅच करायला) जमायला हवा…..
मानवी स्वभावाच्या थोडं विरूद्ध आहे, पण चांगल्या हेतूने पुढे जाताना काही गोष्टी अशा मागे सोडून दिलेल्या बऱ्या.
इगो अन रिव्हेंज हे आपल्या उमेदीच्या काळातील सर्वात मोठे शत्रू आहेत.
मुद्दा काय? आंदोलन काय? करतोय कोण? का? कशासाठी? कशाला कशाचा मेळ नाही!
सोशल मिडीयाने पार सगळं पोखरलंय आणि ही असली पोरं आपल्या देशाचं भविष्य 🤦♂️
त्यांचे शिक्षक आणि आईवडील नक्की काय विचार करत असतील?
महिन्याला ५/१० हजार पगार असेल तेंव्हा बचत किंवा गुंतवणूक वगैरे आवाक्याबाहेर होत्या, आर्थिक चणचण प्रचंड जाणवायची?
आता महिन्याला हजारो-लाखो रूपये मिळवूनही ताणतणाव,तशीच पैशांची चणचण जाणवत असेल तर यालाच आर्थिक निरक्षरता म्हणतात.
#आर्थिकसाक्षरता म्हणजे फक्त जास्त पैसे कमविणे नव्हे.
▪️जर एखाद्यास प्रवासाचा कंटाळा येत असेल,
▪️एखाद्या ठिकाणी अपमान होईल याची भीती/लाज वाटत असेल
▪️काम/हक्काचे पैसे मागायला संकोच वाटत असेल,
▪️बौद्धिक/शारिरिक कष्ट,ताण याचा त्रास होत असेल
▪️अभ्यास,स्पर्धा,नवे तंत्रज्ञान याचा कंटाळा येत असेल,
तर अशांनी अजिबात उद्योग-व्यवसाय करू नये!
पैसे कमवायला लागल्यावर कुटूंबाची जबाबदारी, कधी कर्जफेड, गुंतवणुक, गाडी, घर, तर काही लोक वाईट व्यसनाच्या आहारी जातात.
प्रत्येकजण स्वतःच्या बुद्धी, संस्कार व उत्पन्नाप्रमाणे वागतो.
हे सर्व करत असताना पैशांचा काही वाटा स्वतःचे छंद, आनंद, पर्यटन व आयुष्य समृद्ध करण्यासाठी वापरावा!
दर सोमवारी सकाळी सकाळी कमीतकमी तासभर तरी आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्या विषयासंदर्भातील महत्वाची साप्ताहिकं, मासिकं, जर्नल्स चाळायची, वाचायची.
त्यातील महत्त्वाच्या घटना, शोध व तंत्रज्ञान याच्या नोट्स काढून आठवडाभरात वेळ मिळेल तसा त्यावर अभ्यास करायचा!
कामात नवी उर्जा मिळते.
लहानपणी परिक्षेचे मार्क पाहून जे ठराविक लोक मनाविरूद्ध अभिनंदन करायचे, बळेच फाटलेला खिसा पाहून खिजवण्यासाठी पेढे मागायचे…त्यांना आजही आपला तोच फाटका खिसा हवा असतो…..तो तसा दिसला नाही की ते द्वेष आणि मत्सराच्या आगीत भस्म होतात पण सुधारत नाहीत!
हा पण आपलाच समाज, तो बदलायला हवा!
कोल्हापुर आर्थिकदृष्टया संपन्न आहेच पण वैचारिक तसेच बौद्धिकदृष्ट्याही प्रगल्भ आणि अधिक श्रीमंत आहे.
#शाहूवंदन हा कार्यक्रम मनापासून भावलाच शिवाय कोल्हापूरकरांबद्दल आधीपासून असलेला आदर, प्रेम द्विगुणित झाले! ✊❣️
#शाहूस्मृतीशताब्दी 🙌🙏
वेळ काढा, वाचा.
पुस्तकं वाचा, लेख वाचा.
ऑडीयोबुक्स, पॉडकास्ट ऐका.
शक्य असेल ते माध्यम वापरा पण विविध विषय समजून घ्या. त्यातून आवड निर्माण झाली की एक नवं जग गवसेल ते आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलेल.
स्पेशली, करियरच्या महत्त्वाच्या टप्प्यावर असणाऱ्यांना चांगली दिशा मिळेल.
एखाद्याचं उद्योगधंद्यात नुकसान झालं तर जेवढा आनंद त्याच्या भावकीला, पै पाव्हण्यांना, ओळखीपाळखीच्यांना होतो तेवढा तर त्या माणसाच्या व्यवसायतल्या स्पर्धकाला किंवा शत्रूलाही होत नसावा…..
“तो बुडाला” हे सांगताना काहींना इतक्या उकळ्या फुटतात जणू काय सांगू अन काय नको 🤦♂️ विकृती 🤦♂️
आयुष्यभर ज्यांना आदर्श म्हणून मिरवावं वाटतं असे छत्रपती शाहू महाराज 🙏
१०० सेकंद कृतज्ञतेचे…
६ मे, २०२२ रोजी, सकाळी १०ः०० वाजता.
बरं ही कृतज्ञता म्हणजे काही उपकाराची परतफेडही नाही, खर तर ही स्वतःला जागं ठेवण्याची धडपड आहे.
#शाहूवंदन मी करणार! ✊🙏
अपमान पचवून पुन्हा उभं रहायला खर नैतिक धैर्य लागतं…..आपल्या मराठी कुटूंबामधे अशी नैतिकता ठासून भरलेली असते पण आपल्यात “अपमान” फार वेळ डोक्यात घेऊन जगण्याचा वाईट गुण आहे.
कोणती गोष्ट किती वेळ ताणून धरायची याची मर्यादा कळली की ध्येय साधणं सोपं जातं!
टाटा आणि महिंद्र यांनी ऑटोमोबाईल क्षेत्रात जणू कात टाकलीये. अमुलाग्र बदल झालाय.
त्यांच्या गाड्यांच्या डिझाईन्स, तंत्रज्ञान, फिचर्स व किंमतीचा “भारतीय मेळ” नक्कीच सुखावणारा आहे.
दोन्ही ठिकाणी आपल्या मातीतले बरेच तंत्रज्ञ, इंजिनियर्स महत्वाची भूमिका निभावतात.
सर्वार्थाने अभिमान!
आपल्या जन्माच्या वेळेस घरची आर्थिक परिस्थिती कशीही असो-
ती कमी होणार,तशीच राहणार की वाढणार? हे आपल्या वैचारिक भरणपोषणावर अवलंबून असते.
वैचारिक समृद्धीसाठी या गोष्टी महत्त्वाच्या-
१-वाचन
२-आजूबाजूच्या माणसांची संगत.
३-ठोस कृती.
४-सतत नव्या गोष्टी शिकण्याची आस.
#आर्थिकसाक्षरता
आपल्याला बऱ्याचदा वाटते की अचानक भरपूर पैसे मिळावे आणि मग आपण आयु���्यभर सुखी, समाधानी होऊ तर ते पुर्णपणे चूक आहे.
संपुर्ण आर्थिक सुरक्षितता हवी असेल तर ज्ञान, अनुभव आणि सतत कष्ट करण्याची क्षमता याला पर्याय नाही.
#गोष्टपैशापाण्याची #आर्थिकसाक्षरता #अवतरण
शेअर मार्केट म्हणजे “Easy Money” हा फार मोठा गैरसमज लोकांमधे आहे. हे काही जुगार,मटका वा लॉटरीचे तिकीट नव्हे.
प्रचंड अभ्यास, संयम, दूरदर्शी विचार, वाट पाहण्याची आर्थिक ताकद/कुवत असेल तरच यात या.
झटपट श्रीमंती अन लोभापायी आलात तर तुमची १००% शिकार होणार हे नक्की!
#आर्थिकसाक्षरता
लहान भावाचं शिक्षण व्हावं म्हणून मोठा भाऊ शिक्षण सोडून रोजगाराला लागतो…राब राब राबतो. काबाडकष्ट तसा फार लहान शब्द असतो अशा बाप माणसांसाठी,स्वतःच्या स्वप्नांची राखरांगोळी करतो,
लहाना पुढे साहेब बनतो.
मग तो दाद्याला वाऱ्या-पावसात सोडून स्वतःच्या बायकापोरांसह भूर्र उडून जातो…😞
अपयशाने खचून जावू नये वगैरे वगैरे भाषणातून बोलायला ठिक असते. जेंव्हा ती वेळ आलेली असते तेंव्हाची परिस्थिती फार भयंकर असते!
प्रयत्नच केलेले नसतील तर फार फरक पडत नाही पण कष्ट करूनही पदरी निराशा येते ते पचविणे व त्यातून उठणे मात्र नक्कीच अवघड असते.
अनुभवाने व वाचनाने ते सोपे होते.
स्वतःची ओळख तयार झाल्यावर जग आपल्या मागे येतं पण आपण कोणीच नसताना -
नाव,गाव,पैसे,घरदार,वर्तमान,भविष्य कशाचाही पत्ता नसताना -
अगदी सर्वसामान्य व आव्हानात्मक अवस्थेत आपल्यावर विश्वास ठेवणारी,
सोबत ठाम उभं रहात असलेली माणसं म्हणजे कोहिनूर हिऱ्यापेक्षाही मौल्यवान, अमुल्य दौलत!❣️
आपली मुलं योग्य मार्गाने पैसे कमवायला लागल्यावर सर्वाधिक आनंद आईवडिलांच्या चेहऱ्यावर असतो.
त्यातही कायम आर्थिक ओढाताण असलेल्या कुटूंबात हे सुख म्हणजे सोहळा असतो….. आर्थिक स्वातंत्र्य हीच प्रत्येक तरूण-तरूणींची उमेदीच्या काळातली प्रायोरिटी हवी.