२०० रुपये किलो असणारं चिकन हॉटेलात ६०० रुपये देऊन खातील, ९० रुपयांच्या आसपास पेट्रोल झाले तरी गाडीची टाकी फुल करून रिफ्रेशमेंटच्या नावाखाली कुठेतरी माळरानावर जाऊन नाचतील. पण १० ची भाजी २० झाली की लगेच गळे काढतील. शेतकरी घामाचंच मोल मागतोय ना? मग का दुखतं एवढं?
श्रेयाच्या हस्ताक्षराचे सर्वत्र कौतुक झाले, मात्र त्याच स्पर्धेत प्रथम आलेला गणराज मात्र जास्त प्रसिद्धीझोतात आला नाही. गणराजची परिस्थिती हलाखीची असून त्याचे वडील पक्षाघाताने आजारी आहेत. त्यामुळे मुलांचे शिक्षण, घरखर्च आणि पतीचा दवाखाना हे सर्व आईच बघते.
गणराजचे हस्ताक्षर 👇
पुण्यातील "निर्भय बनो" सभेला जात असताना निखिल वागळे, असीम सरोदे, विश्वंभर चौधरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर भेकड भक्तांनी हल्ला केला. त्या सगळ्या भक्तांना भक्ती कुंभार नावाची सावित्रीची लेक एकटी भिडली आणि हल्ला परतवून लावला. सलाम!🙏
नितीन गडकरी कधी ट्रोल होत नाहीत, अगदी विरोधी पक्षातील कार्यकर्तेसुद्धा त्यांचं कौतुक करतात.
त्याचं कारण की ते फालतू राजकारण कधी करत नाहीत आणि कामातून स्वतःला सिद्ध करतात.
बाकीचं तर तुम्हाला माहीतच आहे.
एसटीमध्ये आमदार खासदारांसाठी राखीव जागा असते पण ते मात्र कधीच एसटीत बसत नाहीत. गणपतराव आबा मात्र त्याला शेवटपर्यंत अपवाद राहिले. ११ वेळा जनतेतून निवडून येणे ही काही साधी गोष्ट नव्हती. सर्वसामान्य व गोरगरीब जनतेचा नेता आज हरपला. गणपतराव (आबा) देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली.💐🙏
बारा वर्षानंतर क्रश अचानक भेटणे, एकमेकांचे नंबर शेअर होणे आणि व्हाट्सऍप चॅटवर तिने सांगणे कॉलेजात असताना मला तू आवडायचास.
यापेक्षा वेदनादायी काय असू शकतं का?🙂
पुण्यात रिक्षाने फिरत असताना युपीमधून इकडे आलेला रिक्षावाला सांगत होता "योगीजींनी तिकडची सगळी गुंडगिरी संपवून एक आदर्श राज्य निर्माण केले आहे." त्याला म्हटलं मग तू इकडे काय करतोय? तिकडेच काहीतरी बघायचं ना. तर तो म्हणाला "अहो मी तिकडचा खूप मोठा गुंड होतो."
खरं तर श्रीनिवास पाटील राज्यपाल म्हणून सिक्कीममधे चांगले रमले. कार्यकाळ संपल्यानंतर पुन्हा कराडला आले. सक्रिय राजकारणातून ते जवळपास निवृत्तच झाले होते. मात्र अचानक उदयनराजेंनी खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि पवार साहेबांनी आपल्या जिगरी मित्राला साद…
उद्धव ठाकरे हे लादलेले राजकारणी आहेत असं याआधी वाटायचं. कदाचित राजकीय विरोधक म्हणून तसं वाटत असेल.
परंतु मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यापासून त्यांनी ज्या पद्धतीने कामाचा धडाका लावलाय त्यामुळे माझ्यासारख्या अनेकांचे मतपरिवर्तन झालंय.
खरंच काही माणसं त्या उंचीवर गेल्यावरच समजतात.
काय नाय रे नवनाथ. बक्कळ पैसा कमावशील, एकावर एक फ्लॅट घेशील. गावाकडे जागा, जमीन घेशील. पण माझा बाप स्वाभिमानी होता, लाचार नव्हता असं आपल्या पोराबाळांच्या तोंडून ऐकायचं भाग्य तुझ्या नशिबी कधीच नसेल.
ट्विटरवर फडणवीसांचे ४२ लाख फॉलोवर्स आहेत आणि पवार साहेबांचे १६ लाख आणि यावरून फडणवीस लोकप्रिय आहेत म्हणतात.
मजेशीर हे आहे की ६ लाख फॉलोवर्सवाले अजितदादा ४० लाख वाल्याला येड्यात काढून आले.
ट्विटरचा नाद लागल्यापासून कित्येक दिवस फेसबुक, इन्स्टाग्राम बघणे होत नाही, व्हाट्सऍप आणि टेलिग्रामच्या मेसेजेसना उशिरा रिप्लाय जात आहेत.
पण एकंदरीत इतर माध्यमांपेक्षा ट्विटर हे भारीच वाटतंय.😊
आव्हाडांनी तुतारी वाजवून दाखवली तर लाख रुपये देईल म्हणत मिटकरी यांनी लिहिलेला हा चेक आहे. चेक लिहिताना मात्र रकमेच्या जागी नाव आणि नावाच्या ठिकाणी रक्कम टाकली आहे. घासलेट चोरीचा आरोप असणाऱ्यांनी आयुष्यभर मानधनाचे पाकीट स्विकारण्यापलिकडे केलेच काय आहे म्हणा की यांना व्यवहार समजेल.
अजितदादा पवार यांचे लहान बंधू श्रीनिवास पवार यांनी सध्याच्या घडामोडींवर त्यांना काय वाटतं, त्यांच्या काय भावना आहेत हे त्यांनी मोजक्या शब्दात नेमकेपणाने सांगितले आहे.
कुळाबाहेर सोयरीक करणार समजल्यावर एक सख्खा नातेवाईक म्हणाला हे जमणार नाही, आपले संबंध खराब होतील. म्हटलं असाही नातेवाईक असून तुझा काय उपयोग आहे? कोललं तुला चल.
राहुल चांगले कपडे घालतो म्हणून टीका होतेय. जसकाय भाजपचे नेते आणि त्यांची पोरं स्वारगेटवरून ४५ रुपयांचा शर्ट घेऊन जातात असं बोलताहेत. आजकाल मध्यमवर्गीय लोकसुद्धा पॉश राहतात. राहुलची तर आजी अन वडील या देशाचे पंतप्रधान होते आणि त्याने भीक मागून जगल्याचाही कधी दावा केलेला नाहीये.
एकंदरीत मोहिते पाटील राष्ट्रवादीत येणारच ���ोते याबाबत साहेबांना खात्री होती. तरीही मधल्या काळात पवार साहेब महादेव जानकरांच्यात हवा भरत राहिले. यामुळे अडगळीत गेलेल्या जानकरांची भाजपला आठवण झाली आणि घाईगडबडीत त्यांना आपल्याकडे खेचत परभणीची घड्याळाची जागा त्यांना देऊन टाकली. लगेचच…
आई,
माझा अर्धा पगार अट्रोसिटी केसमधील वकिलाला अन् अर्धा ह्या शिवकुमारच्या दारू, सिगारेट, मटण पार्टीला खर्च होतोय. आई, वडील गेल्यानंतर तुझ्या औषध गोळ्यांचासुद्धा खर्च जर मी करू शकत नसेल तर सांग मी जगून तरी काय करू?
- दिपाली चव्हाण
मित्राची बहीण कोविड ड्युटी संपवून घरी जाताना अज्ञात वाहनाने धडक दिली, मार लागून दिड तास रस्त्यावर पडून होती, लोक फोटो काढून जात होते, ती लोकांना घरी फोन करायला सांगत होती पण कुणीच ऐकले नाही, शेवटी कसाबसा तिनेच घरी फोन करून घरच्यांना बोलावून घेतले. संवेदनशून्य होत चाललोय का आपण?😢
ज्याच्यात स्वतः निस्तरायची धमक आहे त्यानेच ट्रोलिंग, राजकारण ह्याच्या नादी लागावं. अजून स्वतःच्या पायावर उभे नसणारे अनेक विद्यार्थी, तरुण इथे पूर्णवेळ राजकीय ट्विट, ट्रोल करत असतात. तुमच्यावर प्रसंग ओढावला तर कसं हाताळणार आहात? लोक फार तर फार ट्रेंड करतील, जामीन देतील. पुढे काय?
एका वृत्तवाहिनीने विराट-अनुष्काच्या मुलीसाठी नाव सुचवण्याचे आवाहन केले तर एकाने आलिया भट्टच्या मांजरीचे निधन झाल्याची बातमी दिली. या दोन्हीही बातम्यांचा भारत महासत्ता होण्यात खूप महत्त्वाचा वाटा असणार आहे त्याबद्दल चौथ्या स्तंभाचे मनःपूर्वक धन्यवाद.
परदेशात आपली भेट झाली की आपण एकमेकांसाठी भारतीय असतो. भारतात आलो की मग राज्याराज्यात विभागतो. आपल्या राज्यात आलो की जिल्ह्यात/विभागात विभागतो. आपल्या विभागात आलो की मग जातीत आणि गावात आलो की पोटजातीत. तू हलका अन् मी भारी.🙂
रशिया आणि युक्रेन भारताच्या खालच्या आळीला आहेत की वरच्या आळीला हे माहित नसणाऱ्या पोरांनीही शेठजी युद्धात यशस्वी मध्यस्थी करणार असल्याचे स्टेट्स ठेवलंय. ह्या दुनियेत एखाद्याला शहाणं बनवण्यापेक्षा येडं बनवणं जास्त सोप्पंय.
उदाहरणार्थ :
लॉकडाऊन लागल्यावर राहुल कुलकर्णींच्या वार्तांकनावर ठपका ठेवत सरकारने त्यांच्यावर कारवाई केली. तसं तर हा राग मनात धरून त्यांनी ठाकरेंविरुद्ध आयुध उपसले असते. मात्र त्यांनी काल वास्तविक परिस्थिती दाखवत निःपक्ष पत्रकारितेचे उदाहरण दाखवून दिले. यात मिंधेपणा कुठे आहे?
राजकारणात जाण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या युवकांनी मला राजकारणातील रविंद्र धंगेकर व्हायचंय हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवले पाहिजे. जनतेलाच कुटुंब म्हणून त्यांची सेवा करत राहिलात तर जनता कधीच तुम्हाला अंतर देणार नाही. महाशक्तीला घाम फोडण्याची ताकद फक्त जनशक्तीमधेच आहे.❤️
#जायंटकिलर
आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं आणि निघून जायचं. असेही मुख्यमंत्री फक्त नामधारी आहेत बिचारे, ते दुसरं करू तरी काय शकतात? आणि आपल्या प्रश्नांची उत्तरे द्यायला ते आपल्याला बांधील थोडी आहेत. नाही का?
पुण्यातील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये पाहुण्यांचे निधन झाले. सर्व सोपस्कार पार करून तिथे ॲम्बुलन्सची विचारणा केल्यावर अवास्तव भाडे सांगितले. मित्राकरवी दुसरी ॲम्बुलन्स बोलवून बॉडी घरी नेत असताना एक फोन आला, या हॉस्पिटलला फक्त माझ्याच ॲम्बुलन्स चालतात तुम्ही बाहेरची बोलावलीच कशी?
अनेकांना चांगला जॉब पाहिजे असतो पण तेवढा अभ्यास करायचा नसतो तसंच जॉब लागला की अनेकांना चांगला पगार पाहिजे असतो पण तेवढं प्रभावी काम करण्याची त्यांची इच्छा नसते. राग येईल पण ही सत्य परिस्थिती आहे.
काय झाडी, काय हाटील, काय डोंगर व्वा व्वा. अन् मला श्रद्धांजलीपर भाषण करू दिलं असतं तर मी अख्ख्या सभागृहाला रडवले असते. अरे लोकप्रिनिधी म्हणून आपल्या प्रायोरिटी काय असाव्यात हे कळावे यासाठी यांना निवडणूक लढविण्यासाठी शिक्षणाची अट ठेवलीच पाहिजे असंच वाटतंय.
२००७ साली एमपीएससीचे निकाल लवकर लागत नव्हते. पुण्यातील जयकरचे विद्यार्थी मोठ्या आशेने अण्णांकडे प्रश्न घेवून गेले होते. अर्धा डबा खाऊन आपली भूक भागवणाऱ्या विद्यार्थ्यांना अण्णांनी आपल्या ट्रस्टच्या नावे देणगीची पावती मागितली तेव्हापासून अण्णांवरचा आपला विश्वासच उडाला.
साखर कारखान्याच्या निवडणुकीत कोट्यावधी रुपये उधळायला सगळ्यांकडे पैसे आहेत परंतु कारखान्याच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला रिफ्लेक्टर बसवायला कुणाकडेच पैसे नाहीत. श्रीगोंद्यात तीन तरुण पोरं जाग्यावर गेली आज.😢
लग्न झाले की लग्नाचे १-२ वाढदिवस होईपर्यंत "असा जोडीदार मिळायला भाग्य लागतं".
आणि त्यानंतर मग "मी होते म्हणून टिकले, दुसरी असती ना कधीच निघून गेली असती".
चिन्मय सकाळी लवकर उठतो, आवरतो, डबा घेतो आणि कॅबने ऑफिसला मगरपट्ट्यात जातो.
त्यापाठोपाठ तन्मयही आवरतो, डबा घेतो आणि कॅबने हिंजवडीला ऑफिसला जातो.
मग एकदा ऑफिसला पोहोचले की दोघेही पवारांनी राज्यासाठी काय केलं, महाराष्ट्राचं कसं वाटोळं केलं या विषयावर मनसोक्त ट्विट्स झोडतात. 😂
कोश्यारी यांच्याकडे गोवा राज्याचाही प्रभार आहे. त्या ठिकाणीही दारूची दुकाने उघडी आणि मंदिरं बंद आहेत. राज्यपाल महोदयांनी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनाही असे पत्र लिहिले आहे का?
- बाळासाहेब थोरात
@bb_thorat
१. विधानसभेत विरोधी पक्षनेता वंचितचा असेल, काँग्रेस-राष्ट्रवादीचा नसेल - देवेंद्र फडणवीस
२. त्यांनी आरशापुढे उभे राहावे त्यांना पुढचा विरोधी पक्षनेता दिसेल - बाळासाहेब थोरात 😂
राम सातपुतेच्या मुजोरीपणाला खुद्द मोहिते पाटील कुटुंबीय सुद्धा वैतागले आहे हे आज धैर्यशील पाटील मोहिते यांच्या भाषणातून दिसून आले. अल्पावधीत हवेत गेलेलं लेकरू आता जरा जमिनीवर येईल. बाकी धैर्यशील मोहिते पाटलांचे भाषण जर राम सातपुतेने आज ऐकलं तर तो आज झोपत नसतो.
धाराशिवच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या सभेत गेलेल्या एका कष्टकरी माणसाचे हे मत आहे. ५०० रुपये हजेरीने तुम्हाला गर्दी करायला डोकी मिळतील पण सामान्य जनतेचे मत मात्र महाविकासआघाडीच घेणार. बेईमानीपणा सामान्य जनतेला अजिबात रुचलेला नाहीये.
काटेवाडी ते दिल्ली
शाळेत असताना शरद पवार नावाच्या मुलाने गोवा मुक्ती संग्रामाला समर्थन म्हणून शाळेतल्या मुलांचा मोर्चा काढला आणि आजपासून ६० वर्षांपूर्वी याच तरुणाने पुण्यात महाविद्यालयीन निवडणुकांमध्ये भाग घेऊन आपल्या सामाजिक व राजकीय जीवनाचा श्रीगणेशा केला व त्यात यशही मिळवले.
शिर्डी साईबाबा संस्थानने केंद्र सरकारला सोने देण्याची तयारी दाखवली आहे अशी बातमी वाचली, पृथ्वीराज चव्हाणांना तत्वज्ञान शिकवणाऱ्या बुवाबाजांना फाट्यावर मारून असा निर्णय घेतल्याबद्दल संस्थानचे अभिनंदन.
मी जातपात मानत नाही तुम्हीही मानु नका हा संदेश कृतीतुन जनतेला देणारे, आंतरजातीय विवाहाचे पुरस्कर्ते, आरक्षणाचे जनक, लोककल्याणकारी राजा, समाजसुधारक राजर्षी छत्रपती श्री शाहू महाराजांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन. 🙏💐
#शाहूमहाराज
नाव आणि चिन्ह गोठवलं म्हणजे पक्ष संपला असे होत नाही. ठाकरेंना २८८ मतदारसंघात उमेदवार भेटतील किमान एवढी तरी त्यांची ताकद आहे. त्यात आता या सगळ्या घटनाक्रमांच्या सहानुभूतीची भर.
सत्ता गेल्यामुळे सैरभैर झालेले भाजपचे लोक आता खोटे मेसेज, व्हिडिओ व्हायरल करून या सरकारची बदनामी करू पाहत आहेत. भाजपची झालेली अशी दयनीय अवस्था पाहता खरंच आता त्यांची कीव ये�� आहे. या मानसिक आजारातून ते लवकर सावरतील अशी प्रार्थना आपण करूयात.
कॉर्पोरेट ऑफिसमध्ये मॅनेजर फाडफाड इंग्लिशमध्ये बोलायला लागला की आपली पोरं हिंदीमध्ये चालू होतात. त्यासाठी हिंदीला विरोध करण्याआधी आपली इंग्रजी कच्ची नाही राहिली पाहिजे हे ही ध्यानात घ्या.
शाळेत असताना वाटतं बस्स १०वी झाली की सुटलो, मग वाटतं १२वी, मग डिग्री, मग नोकरी, मग छोकरी वगैरे वगैरे. वास्तविक या शर्यतीतून, आव्हानांतून सुटका कधीच होत नाही जोपर्यंत चार लोक खांद्यावर घेऊन जात नाहीत.🙂
कोरोना हा एक नवीन अनुभव होता.
लक्षणे दिसल्यावर लगेच टेस्ट करून औषधोपचार चालू केले. या काळात आहार मजबूत घ्यायचा असतो परंतु तोंडाला चव नसते. त्यामुळे तो आहार पोटात उतरवण्याची कसोटी असते. साधारण ३-४ दिवसात चव आली आणि औषधोपचाराने ६-७ दिवसात एकदम बरे वाटायला लागले. फक्त घाबरायचं नाही.
पवार साहेबांच्या अंगठ्याला जखम आहे, मधुमेहामुळे ती बरी होत नाही. पाय सुजतात, कायम अंगठ्याला मलमपट्टी आणि सुजेसाठी पुर्णपणे बॅन्डेज असते व त्यावर स्पेशल डिझाईन्ड सँडल असतो जो पुर्णपणे पॅकबंद असतो.
त्यामुळे कार्यक्रमात सँडल काढणे अशक्यच असते. पण काहीजण मुद्दाम गैरसमज निर्माण करतात.
मी ही एकेकाळी कट्टर मराठावादी बनलो होतो. कालांतराने पाटीलकी, देशमुखी, अक्करमाशी, बारामशी प्रकार समजत गेले. या गोष्टींमुळे आपापसात एकमेकांना कमी लेखणारे बांधव बघत गेलो. सगळा फोलपणा लक्षात आला. यापेक्षा माणूस म्हणून जगण्यात खरे शहाणपण आहे समजले.
संदर्भ : गौतमी पाटील आडनाव प्रकरण
मुंबई पोलिसांना बदनाम करण्यासाठी ८० हजार फेक अकाउंट तयार केले होते अशी माहिती येत आहे. सत्ता गेल्याने पिसाळलेले महाराष्ट्रद्रोही लोक प्रसंगी महाराष्ट्राशी सुद्धा गद्दारी करू शकतात हेच यातून सिद्ध झाले. इथल्या मातीचे यापेक्षा मोठे दुर्दैव काय असू शकते?
उद्धव ठाकरेंसाठी बिलकीस बानो ही एक पीडित महिला आहे तर आशिष शेलारांसाठी ती एक मुस्लिम आहे. फक्त मुस्लिमद्वेषातून जर बलात्काराचे समर्थन आणि पीडितेचा द्वेष भाजप करणार असेल तर या देशाचे भवितव्य उज्वलच आहे म्हणावे लागेल.